vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी   

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी

#नांदेड , प्रतिनिधी :- जड वाहनामुळे नांदेड शहरात वाहतुक कोंडी, अपघात अशा समस्‍या उद्भवत आहेत. या अनुषंगाने नांदेड शहरात 7 जानेवारी 2026 पासून जड वाहनांना सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी राहणार आहे. याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्‍यावी असे आवाहन जिल्‍हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

याबाबत अधिसुचना निर्गमीत करण्‍यात आली असून या अधिसुचनेचा अंमल 7 जानेवारी 2026 पासुन सुरु होईल. जड वाहनामुळे शहरातील वाहतुक कोंडी व जडवाहन अपघाताने होणारी जिवीत हानी या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयास विविध संघटना, जनतेकडून निवेदने प्राप्‍त झाली आहेत. 16 डिसेंबर रोजी बैठकीत यासंबंधाने जिल्‍हादंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी समवेत पोलीस अधिक्षक, मार्ग परीवहन अधिकारी नांदेड यांच्यात झालेल्‍या चर्चेनुसार या समस्‍येवर उपाययोजना करण्‍यासाठी जड वाहनांना नांदेड शहरात सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्‍याचे निश्‍चीत झाले आहे. याची सर्व संबंधित जडवाहनधारकांनी नोंद घ्यावी असेही आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ई-पीक पाहणीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 61.79% ई पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी -डीसीएस ॲपव्दारे करा नोंदणीØ तलाठी, कोतवाल, सहायक शेतकऱ्यांच्या मदतीलाØ सातबारावर पीक नोंदणी आवश्यक

vishwatmaklokswamivarta

नागोठणे – वरवठणे मोघलकालीन पूल वाहतुकीसाठी बंद

सोळशी प्रकल्पाबाबतच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या- पालकमंत्री शंभूराज देसाई*  

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीक स्पर्धेत सहभाग घ्यावा- कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून दोषसिद्धी वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- पोलीस दलाच्या बैठकीत घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – बेपत्ता महिलासंदर्भात गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा- मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे- संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमिवर यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना

महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे