vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मुंबईचे तापमान ३६.३ अंश

मुंबई : फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच थंडी गायब झाली असून तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबईत शनिवारी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यापासूनच नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत असून यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचे उच्चांक नोंदवले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील काही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामानात बदल होत आहे. अनेक भागातील किमान तापमानातही वाढ नोंदली जात आहे, तर कमाल तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ झाली असून याआधी दोनदा ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, शनिवारी उन्हाच्या झळा वाढून पारा ३६ अंशावर गेला. हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रात ३६. ३ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३४.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली, जे सामान्य तापमानाहून ४ अंशांनी अधिक होते. तर किमान तापमानातही वाढ झाली असून रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २३.६ तर सांताक्रूझ केंद्रात २२.४ किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे सकाळी जाणवणारा गारवा हळूहळू कमी होत आहे. दरम्यान, रविवारीही शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पुणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे-जन आरोग्य सेवा गौरव पुरस्काराचे वितरण

vishwatmaklokswamivarta

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

vishwatmaklokswamivarta

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ बियाणे, खते शेतकऱ्यांना मुबलक उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करा

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

आषाढी वारीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता पथकाचे पंढरपूर नगरी स्वच्छता कार्य