vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

मुंबई, प्रतिनिधी : मुंबईतील जुन्या इमारती, चाळी तसेच पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.

विधानभवनातील दालनात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत कलशेटकर कंपाउंड येथील ९५ वर्षे जुन्या ‘रामदास मंडळा’स पुनर्विकसित इमारतीमध्ये योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच हररवाला बिल्डिंग क्र. १८ व १९ मधील रहिवाशांना पुनर्विकासादरम्यान देण्यात येणाऱ्या भाड्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आलायाशिवाय यदुवंशी अहिर ग्वाल सकल पंच, कृष्ण छाया (दुरुस्ती इमारत), खिमजी नाणजी कोठारी चाळ, अयोध्या सोसायटी तसेच वॉर्डन वकील चाळ येथील रहिवाशांच्या विविध समस्या आणि तक्रारींवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुनर्विकास प्रक्रियेत मूळ रहिवासी किंवा स्थानिक संस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन प्राप्त तक्रारींवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी. तसेच पात्र रहिवाशांना लवकरात लवकर दिलासा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

संबंधित पोस्ट

हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार- हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार

कुणकेश्वराच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार’ -पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही

जालना शहराच्या शांततेसाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरील उपाययोजना तात्काळ राबविण्यात याव्यात या मागणीचे  निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले

vishwatmaklokswamivarta

नवीन वर्षाच्या निमित्ताने वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ..

vishwatmaklokswamivarta

सांगलीत विविध नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशी ल – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त भारत अभियानांतर्गत अंमली पदार्थविरोधी ठाणे; जिल्हा प्रशासनाने केला संकल्पअंमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी सर्वांना प्रेरणा देण्याचा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा निर्धार

vishwatmaklokswamivarta