vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मुंबईचे तापमान ३६.३ अंश

मुंबई : फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच थंडी गायब झाली असून तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. मुंबईत शनिवारी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यापासूनच नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत असून यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचे उच्चांक नोंदवले जातील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील काही भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामानात बदल होत आहे. अनेक भागातील किमान तापमानातही वाढ नोंदली जात आहे, तर कमाल तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. मुंबईत फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून कमाल तापमानात वाढ झाली असून याआधी दोनदा ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, शनिवारी उन्हाच्या झळा वाढून पारा ३६ अंशावर गेला. हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रात ३६. ३ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३४.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली, जे सामान्य तापमानाहून ४ अंशांनी अधिक होते. तर किमान तापमानातही वाढ झाली असून रविवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २३.६ तर सांताक्रूझ केंद्रात २२.४ किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे सकाळी जाणवणारा गारवा हळूहळू कमी होत आहे. दरम्यान, रविवारीही शहरातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज (दि.८)खेलो इंडिया ‘अस्मिता’लीगचे उद्घाटन

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण-बाल वैज्ञानिक देतील देशाच्या प्रगतीत योगदान- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

🔥 पानिपतची तिसरी लढाई (१७६१)

vishwatmaklokswamivarta