कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*
मुंबई प्रतिनिधी – कल्याण मधील चक्कीनाका येथील 12 वर्षांच्या अल्पवयीन निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून यातील दोषी आरोपींना कठोरता कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.आज कल्याण मधील चक्की नाका येथील बळीत मुलीच्या कुटुंबियांची ना.रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे 1 लाख रुपयांची सांत्वनपर आर्थिक मदत लवकरच करणार असल्याचे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले.पीडित मुलीच्या कुटुंबाला राज्य सरकार तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून भरीव आर्थिक मदत मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.यावेळी स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, पद्मश्री कल्पना सरोज , सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण घिटे, आदी अनेक उपस्थित होते.
कल्याण मधील अवघ्या 12 वर्षांच्या निरागस मुलीची अत्याचार करून हत्या करणारा नराधम गुन्हेगार असून परिसरात त्यांनी अनेक वाईट कृत्ये केली आहेत. चक्कीनाका या परिसरात धोकदायक इमारत असून या इमारतीचा वापर गुन्हेगार आरोपीने दुष्कृत्य करण्यासाठी केला आहे.मनपाने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या इमारती मधील अनेकांनी घरे रिकामी केली असल्याने ही इमारत निर्जन झाली असून त्याचा वापर गुन्हेगार करीत होता.याच इमारतीत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या केली.त्यामुळे ही इमारत कल्याण डोंबिवली मनपा ने त्वरित तोडून टाकावी अशी मागणी बळी गेलेल्या मुलीच्या परिवाराने आणि स्थानिक रहिवासीयांनी ना.रामदास आठवले यांच्या कडे करताच ना.आठवलेंनी के डी एम सी च्या आयुक्त इंद्रायणी जाखड यांना दृध्वनी करून संबंधित धोकादायक इमारत तपासून निष्कासित करण्याचे निर्देश दिले.
अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या अत्याचाराच्या अमानुष घटना घडत असून समाजात माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटना रोखल्या पाहिजेत त्यासाठी सरकार पोलीस आणि जागृत सामाजिक कार्यकर्त्यांनी ही पुढे आले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.