vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड…

लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड…

राज्य प्रतिनिधी -नुकत्याच जाहीर झालेल्या झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा २०२५ चा अंतिम निकालात सारथी, पुणे संस्थेच्या १२ विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

यशस्वी बारा विद्यार्थ्यांची रॅंक व नावे पुढीलप्रमाणे कार्तिक रवींद्र बच्छाव (१७७), हर्षवर्धन हरिश्चंद्र पाटील (३४९), कुणाल संजय अहिरराव (४३०), श्रुती संतोष चव्हाण (५२७), धनंजय संजय दिघे (५२९), अविष्कार विजय डेर्ले (५९१), अभिषेक अशोक टेकाडे (६१०), अश्विनी अरुण कोळेकर (६७५) अल्पेश भाऊसाहेब ढवळे (६८७), सूरज माणिकराव सूर्यवंशो (७०२), रामेश्वर महादु शिंदे (७०५), राजश्री शांताराम देशमुख (७५४).

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. #UPSC #सारथी

संबंधित पोस्ट

दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण…

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना३१ जुलैपर्यंत लाभार्थ्यांनी आधार पडताळणीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन

राज्य महोत्सव गणेशोत्सवाची व्यापकता राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्तरावर वाढवणार- सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण

vishwatmaklokswamivarta

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार-वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते…

राष्ट्रीय लोकअदालतीत २१ हजार ५७३ प्रलंबित प्रकरणे निकाली काढून संपूर्ण राज्यात ठाणे सातत्याने अग्रेसर..

vishwatmaklokswamivarta

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta