vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी.सी. यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला. जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास या सारख्या क्षेत्रांवर भर देत सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण काम करु असे त्यांनी यावेळी सांगितले.

मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून विनय गौडा जी.सी. यांनी आपला पदभार आज स्विकारला. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नूतन जिल्हाधिकारी गौडा यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा श्रीमती संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी रोहयो रुपेश सिनगारे, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नगरपालिका प्रशासन विभागाचे सह आयुक्त सौरभ जोशी, सहा. आयुक्त ऋषिकेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा यांनी मनोदय व्यक्त केला की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटन विकासाला चालना देतांनाच शिक्षण, आरोग्य, जीवनोन्नती उपक्रम, रोजगारभिमुखतेला चालना देणे अशा विविध क्षेत्रात काम करुन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यास आपण प्राधान्य देऊ, असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

श्री. दिलीप स्वामी यांनी या जिल्ह्यात काम करतांना आलेले अनुभव हे सुखद होते असे सांगितले. निवडणूकांचा कालावधी मोठा असतांनाही मोठ्याप्रमाणावर विकासाची कामे मार्गी लावता आलीत,याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बाल विवाह प्रतिबंध, प्रसवपूर्वगर्भलिंग तपासणी या बाबींवरही काम केले. प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर आपण भर दिला, असेही त्यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच यशाचे रहस्य —-जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे ३० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वज स्तंभाचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५’ मध्ये५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटना देशव्यापी आंदोलन छेडणार..

चारित्र्यनिर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन-२९ व्या भारतीय युवा संसद परिषदेचे उद्घाटन

लातूर जिल्ह्यात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहीम; २०.३६ लाख मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा