vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतूमुळे बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेविशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार..

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतूमुळे बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेविशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार..

मुंबई प्रतिनिधी : न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या समस्यांबाबत शासन गंभीर असून मच्छीमारांचे हित अबाधित ठेवून त्यांच्या सर्व प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( एमएमआरडीए) चे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या बैठकीत न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या मच्छीमारांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पुनर्वसन, मासेमारी व्यवसायावर झालेला परिणाम तसेच भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांकडून अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

शासकीय आश्रमशाळा पेंढरघोळ येथे ‘शालेय प्रवेशोत्सव’ उत्साहात चिमुकल्यांचे सजवलेल्या कारमधून आगमन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार

टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न

केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

चेंबूर पेट्रोल पंप कुर्ला स्टेशन मार्गावरून नेहरूनगर डेपो अशी सेवा सुरू करण्याची मागणी-धारावीकरांना चेंबूर मध्ये जाण्यासाठी बस सेवेची अडचण-

चंद्रपूर जिल्ह्यात कोळंबी पालन व्यवसायाला चालना देणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे