vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतूमुळे बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेविशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार..

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतूमुळे बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेविशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार..

मुंबई प्रतिनिधी : न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या समस्यांबाबत शासन गंभीर असून मच्छीमारांचे हित अबाधित ठेवून त्यांच्या सर्व प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( एमएमआरडीए) चे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

या बैठकीत न्हावा-शेवा – शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या मच्छीमारांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पुनर्वसन, मासेमारी व्यवसायावर झालेला परिणाम तसेच भविष्यातील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांकडून अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानुसार पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात सरासरी 1.30 मि.मी. पावसाची नोंद

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ठाणे जिल्ह्याचे यश..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तदि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश.. 

रस्ता दुभाजक तोडणाऱ्यांवर पोलीस;परिवहन आणिसाबांविने संयुक्त कारवाई करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ चळवळ !राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी पोलीस-प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांना निवेदने