vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिरजिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

दिव्यांग सक्षमीकरणासाठी जालना येथे विशेष शिबिरजिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

 

जालना,द प्रतिनिधी): दिव्यांग व्यक्तींना सक्षम व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय जालना, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा परिषद प्रशाला, स्टेशन रोड येथे जालना जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात, कृत्रिम पाय तसेच पोलिओग्रस्त व्यक्तींना कॅलिपर्सचे वाटप विशेष सहाय्य वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, जवळपास 80 लाभार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत योग्य नियोजन व उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. उपस्थित दिव्यांग बांधवांनी प्रशासनाच्या या संवेदनशील उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच बुधवार, दि. 26 मे 2026 रोजी हे विशेष शिबिर सुरू राहणार असून अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी केले.यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्री. खरात यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

 

****

संबंधित पोस्ट

महारेशीम अभियान २०२५;वर्षभरात २.२५ मे.टन धागा निर्मिती-जनजागृतीसाठी प्रचार रथ रवाना

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वा. पर्यंत राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहीमेची नागरिकांकडून प्रशंसा…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या महान वारशाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहूया.राष्ट्रीय सलोखा, सामर्थ्य आणि एकता याबद्दलची आपली बांधिलकी पुन्हा एकदा दृढ करण्यासाठी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा.

vishwatmaklokswamivarta

आंध्रप्रदेशात कुर्नूल जिल्ह्यात आज पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बस बंगळुरुहून हैद्राबादला जात होती.

vishwatmaklokswamivarta

ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल-आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

vishwatmaklokswamivarta

मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक

vishwatmaklokswamivarta