
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले ….
मुंबई प्रतिनिधी
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याआधी नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप अध्यक्षाची निवड झालेली नाही. ती यावेळी आवाजी मतदानाने घेण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरु आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं विधान केलं आहे.
महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांकडे अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चेसाठी गेले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यपालांच्या अधिकारबद्दल मी बोलणं बरोबर होणार नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलण्याचा अधिकार महाविकास आघाडीच्या नेत्यांना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.चंद्रकांत पाटील म्हणाले की, आता तुम्ही नियमात बदल करून त्यांच्याकडे तारीख मागताय, दोन वेळा तुम्हाला तारीख दिली पण निवडणूक घेतली नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेणं हा घटना राज्यपालांचा म्हणजे पर्यायाने घटनेचा अवमान असतो. या एका मुद्द्यावर सुद्धा राष्ट्रपती राजवट येऊ शकते असं त्यांनी म्हटलं.
चंद्रकांत पाटील यांनी याआधीही राज्यात राष्ट्रपती राजवटीबद्दल विधान केलं होतं. त्यामुळे बरीच चर्चाही झाली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी काही काळ राष्ट्रपती राजवट लागू होती



