vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राहुल गांधी यांची: भारत जोडो यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल

 राहुल गांधी यांची: भारत जोडो यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल…

 

विदर्भ प्रतिनिधी

भारत जोडो यात्रा आज विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला आहे. भारत जोडो यात्रेस मराठवाड्यातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला असुन आता विदर्भवासियांकडून देखील राहुल गांधींचे दणक्यात स्वागत करण्यात आले आहे.

 

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज महाराष्ट्रात नववा दिवस आहे. नांदेड जिल्ह्याच्या देगलूर येथून महाराष्ट्रात प्रवेश केलेली भारत जोडो यात्रा आज विदर्भाच्या वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला आहे. येथे राहुल गांधींचं विशेष स्वागत करण्यात येणार आहे. वाशिम येथील अंजनखेडी या गावात भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे. आज संध्याकाळी ७ वाजता राहुल गांधी सभा घेणार आहे. तसेच विदर्भवासियांचे प्रश्न समजून घेणार आहेत. भारत जोडो यात्रेस मराठवाड्यातून उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला असुन आता विदर्भवासियांकडून देखील राहुल गांधींचे दणक्यात स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान विदर्भातील बरेच कॉंग्रेसचे महत्वाचे नेते या यात्रेस हजेरी लावणार आहेत. राज्यातील विविध दिग्दज नेत्यांसह काही सिनेअभिनेत्यांनी देखील या यात्रेस उपस्थिती नोंदवली आहे. तरी आजचा दिवेस भारत जोडो यात्रेसाठी खास आहे. तरी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) या भारत जोडो यात्रेस (Bharat Jodo Yatra) मिळणारा सहभाग कौतुकास्पद आहे.

 

भारत जोडो यात्रा  हिंगेली जिल्ह्यातून वाशिम  जिल्ह्यात येवून पोहोचली आहे. यानंतर ही यात्रा बुलढाणा  आणि अकोला (Akola) या जिल्ह्याच्या दिशेने रवाना होणार आहे. म्हणजेचं राहुल गांधींच्या  या भारत जोडो यात्रेत  मराठवाडा  आणि विदर्भातली (Vidarbha) जिल्हे केंद्रस्थानी आहेत. तरी राज्यातील एकूण १४ दिवसांच्या कालावधी पैकी आज भारत जोडो यात्रेचा नववा दिवस आहे. 

संबंधित पोस्ट

श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमले अवघे चंद्रपूर!आकर्षक रोषणाई व आतषबाजीने वेधले चंद्रपूरकरांचे लक्ष अभूतपूर्व उत्साहाने वातावरण भक्तीमयपोलिसांच्या चोख बंदोबस्तात निघाली शोभायात्रा

नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता· नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

चैत्यभूमीचा स्तूप दीक्षाभूमीसारखा भव्य दिव्य उभारण्यात यावा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिन शिबिरात विविध पारितोषिके प्राप्त करणाऱ्या एनसीसी कॅडेट्सचा केला सत्कार महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट: राज्यपालांकडून कॅडेट्स ना कौतुकाची थाप..

vishwatmaklokswamivarta

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी.