vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा**‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश*

*गृहमंत्री अमित शाह यांनी दिली लंगरसेवा**‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रमात भक्तिभावाचा अनोखा संदेश*

 

 नवी मुंबई, प्रतिनिधी:- गृहमंत्री अमित शाह यांनी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ समागम कार्यक्रम दरम्यान स्वतः लंगरमध्ये संत महंताना भोजन वाढून सेवा दिली. ‘सेवा हीच खरी श्रद्धा’ या शीख परंपरेचा आदर्श त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भोजन वाढून लंगर सेवा दिली.

            कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर सुरू असून सर्वधर्मीय भाविकांसाठी विनामूल्य भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आठ ठिकाणी सुरू असलेल्या लंगरमध्ये हजारो स्वयंसेवक सेवा बजावत आहेत. भाई जैताजी लंगर सेवा, राधास्वामी ब्यास लंगर सेवा, बाबा मक्खन शाह लबाना लंगर सेवा, संत सेवालाल महाराज लंगर सेवा, बाबा दीप सिंघा ब्यास लंगर सेवा, भगवान झुलेलालजी लंगर सेवा, भाई मतीदासजी लंगर सेवा या आठ सेवादार लंगरमध्ये पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतला, तर दुसऱ्या दिवशी हा प्रतिसाद अधिक वाढला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या समागम कार्यक्रमात गुरु ग्रंथ साहिब यांच्या पावन उपस्थितीत कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरू होते. “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल”च्या जयघोषात भाविकांनी दर्शन व लंगर सेवेचा लाभ घेत घेतला.

लंगर ही केवळ भोजन व्यवस्था नसून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारी परंपरा आहे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्वतः लंगर सेवा देत या परंपरेचा सन्मान केला. ‘हिंद-दी-चादर’ समागमातून सामाजिक ऐक्य आणि एकात्मतेचा प्रभावी संदेश दिला.

०००

संबंधित पोस्ट

मेहकर येथील एमईएस कला व वाणिज्य महाविद्यालयात गुरुवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नवलारी गडचिरोली: महिला सक्षमीकरणाचा ‘गड’

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामटी कटकमंडळांचे महापालिकांमध्ये विलिनीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटकमंडळ क्षेत्रात मिळणार नागरीसुविधांचा लाभ

विधानसभा लक्षवेधी सूचना पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

.आज नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.

vishwatmaklokswamivarta