vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुजरात राज्य सरकार शाळांमध्ये पुढील सत्रापासून भगवद्गीता शिकवली जाणार…गीता जयंतीनिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया  यांची ही घोषणा

 गुजरात राज्य सरकार शाळांमध्ये पुढील सत्रापासून भगवद्गीता शिकवली जाणार…गीता जयंतीनिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया  यांची ही घोषणा

 

राज्य प्रतिनिधी

आता गुजरात (मधील शाळांमध्ये पुढील सत्रापासून भगवद्गीता शिकवली जाणार आहे. गीता जयंतीनिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया  यांनी ही घोषणा केली आहे

आता गुजरात मधील शाळांमध्ये पुढील सत्रापासून भगवद्गीता (शिकवली जाणार आहे. गीता जयंतीनिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी ही घोषणा केली आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना गीता शिकवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत त्याची अंमलबजावणी होत असल्याचे पानशेरिया यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांना समृद्ध, वैविध्यपूर्ण ज्ञान प्रणाली आणि भारताच्या प्राचीन संस्कृतीशी जोडणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी सांगितलं की, भगवद्गीता वाचून विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल. त्यांचा दृष्टीकोन बदलेल. विद्यार्थ्यांना विश्व आणि पर्यावरणाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणी जाणून घेता येतील. इयत्ता आठवी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांचे लोकार्पण करताना पानशेरिया म्हणाले की, लहान वयात मिळालेले शिक्षण आयुष्यभर लक्षात राहते. राष्ट्रपिता महात्मा गांधी तरुण असताना त्यांनी एकदा राजा हरिश्चंद्राचे नाटक पाहिले होते. या नाटकाचा त्यांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी सत्याचा अवलंब करून त्याला आपले शस्त्र बनवले

पानशेरिया यांनी पुढे बोलताना सांगितलं की, सनातन हिंदू धर्माचा सर्वात मोठा धर्मग्रंथ ‘श्रीमद भागवत गीता’ असून हे आपल्या संपूर्ण जीवनाचे सार आहे. ज्यामध्ये अध्यात्म, व्यवस्थापन, नेतृत्व, सर्जनशीलता, मूल्ये आणि उत्कृष्टतेचे शहाणपण हे उत्तम समाज घडवण्याची अनोखी शस्त्रे आहेत. भगवद्गीतेची शिकवण आजही प्रासंगिक आहे.

 

संबंधित पोस्ट

सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्काराची तयारी; ब्रह्मकुमारी पद्धतीने अंत्यविधी

vishwatmaklokswamivarta

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज- सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू

दक्षिण मुंबईतील प्रख्यात बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून मारली उडी

vishwatmaklokswamivarta

प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

माजी लष्करअधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार –‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’*

बाळासाहेब ठाकरेंच्या बहिणीचे पुण्यात निधन, संजीवनी करंदीकरांची प्राणज्योत मालवली