
गुरुपौर्णिमा निमित्त संत संदेश…..*हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी त्याग करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा !* – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
अध्यात्मिक वार्ता प्रतिनिधी
‘गुरुपौर्णिमा हा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि गुरुकार्याच्या वृद्धीसाठी त्याग करण्याचा संकल्प दिवस असतो. व्यापक स्वरूपाचे गुरुकार्य म्हणजे हिंदु धर्माचे कार्य आणि सध्याच्या काळानुसार व्यापक गुरुकार्य म्हणजे धर्मसंस्थापनेचे कार्य अर्थात् हिंदु राष्ट्र संस्थापनेचे कार्य ! अध्यात्मातील अनेक अधिकारी संत हे कार्य करत आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा संतांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्या कार्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करण्याचा संकल्प करणे, हीच गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित असलेली गुरुदक्षिणा ठरेल.



