
नशामुक्त भारत अभियान अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी सामूहिक प्रतिज्ञा घेण्याच्या आवाहन
सातारा प्रतिनिधी मादक पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता य भारताला अंमली पदार्थमुक्त बनवण्याच्या दृष्टीकोनातून केंद शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत ‘नशामुक्त भारत अभियान’ राबविण्यात येत आहे.या निमित्ताने 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविदयालये, सार्वजनिक संस्था, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था केंद्र, व्यकती, समाज कार्य महाविदयालये, शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह, अनुदानित वसतिगृह, दिव्यांग शाळा यामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी, युवक- युवती यांनी प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी केले आहे.
नशामुक्त भारत अभियानाच्या वेबसाईटवरून सर्व विदयार्थि, युवक, युवती, महिला, अधिकारी / कर्मचारी यांनी ई-प्रतिज्ञा घेऊन प्रमाणपत्र मिळवावे तसेच प्रत्येकाने आपले घर, कार्यालय व लगतचा परिसर व्यसनमुक्त करण्यासाठी कटिबध्द राहूयात अस असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी सातारा यांनी केले आहे.
प्रतिज्ञा पुढील संकेतस्थळावरून उपलब्ध करून घ्यावी.-



