vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरघर तिरंगा’स्वातंत्र्यासाठी त्याग, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण हे आद्यकर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरघर तिरंगा’स्वातंत्र्यासाठी त्याग, बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण हे आद्यकर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

 राज्य प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर  तिरंगा ध्वज हा आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. ह्या स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले,घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांचे स्मरण करणे आपले आद्यकर्तव्य असून त्यासाठीच ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात सहभागी होणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

 

हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आज सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज वितरीत करण्यात आला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, डॉ. सुचता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रध्वज वितरण करण्यात आले. भारतमाता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी नियोजन सभागृहात संबोधित केले.

 

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपण आज उपभोगत असलेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. लाखो लोकांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे आपण आज हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यामुळे या त्याग बलिदानाची आठवण ठेवणे व ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने देश हा सर्वतोपरी मानून देशाप्रति आपले कर्तव्य बजावण्यास प्राधान्य द्यायला हवे,असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक प्रभोदय मुळे यांनी केले.

०००००

संबंधित पोस्ट

खोतकरांना विजयी केल्यास ते जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतील-सिमाताई

vishwatmaklokswamivarta

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात  दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाचा दिलासा, परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्यात येणार आहे 

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी. कोकणातील, चिपळूण मध्ये पिंपळी कॅनॉल च्या पुलावर रीक्षा,थार आणि ट्रक अपघात एकूण चार ठार

गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा दि न्यू इरा हायस्कूलमध्ये आयोजन

vishwatmaklokswamivarta

सोलापूर येथील घटना, केस रंगवल्यानंतर लगेच उडाला रंग, संतप्त महिलेने पार्लरची काच फोडत दुकानदाराला केली मारहाण

vishwatmaklokswamivarta