vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत 15,000 रुपयांपर्यंत वाढवणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत 15,000 रुपयांपर्यंत वाढवणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांची घोषणा…

 

राज्य प्रतिनिधी- केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत लवकरच 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी . कृषी महाविद्यालयात शेतकरी सन्मान दिनाच्या कार्यक्रमात मध्ये घोषणा केली आहे

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत लवकरच 15 हजार रुपये करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी पुण्यात घोषणा केली आहे. कृषी महाविद्यालयात शेतकरी सन्मान दिनाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत, ज्यात आर्थिक पाठबळ देण्यासाठी पीएम किसान योजना आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात आणि नमो शेतकरी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेद्वारे राज्य सरकारकडून 6,000 रुपयांची रक्कम दिली जाते. राज्य सरकार आता दोन्ही योजनांतर्गत शेतकऱ्यांना एकूण आर्थिक मदत 15,000 रुपये करण्यावर विचार करत आहे

राज्यातील 25 लाख हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत आठ हजार कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे आवश्यक आहे. सध्या जगभरात नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले जात आहेत. नैसर्गिक शेतीचा वापर करून उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे

संबंधित पोस्ट

माजी सैनिक संवर्गातून कल्याण संघटक या एका पदाच्या निवडीसाठी,इच्छुक माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे

ऑनलाईन गेमनंतर आता करिअर गाईडन्सद्वारे धर्मांतर? नाशिकच्या कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार…

नवी मुंबईत शाळांमधून ‘स्वीप’ उपक्रमांव्दारे विद्यार्थ्यांच्या पालक, नातेवाईकांना मतदानाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी.वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत- स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी

आक्सापूर ते चिंतलधाबा या रस्ता दुरुस्तीचे उर्वरित काम वर्षभरात पूर्ण करणार- मंत्री रवींद्र चव्हाण…

vishwatmaklokswamivarta

सोलापूर शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल-महापालिकेच्या इंद्रभुवन येथे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे