vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश लागू…

 

        सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) दि. 11 फेब्रुवारी 2025 ते दि. 18 मार्च 2025 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) दि. 21 फेब्रुवारी 2025 ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एकूण 51 केंद्रांवर तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा एकूण 103 परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे.

   परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परीक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे.    हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागून राहणार नाही, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.00000

संबंधित पोस्ट

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त एक हजार हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त सहभाग !हिंदू इकोसिस्टम’ बनवण्यासाठी प्रत्येक राज्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीची स्थापना करून हिंदूंवरील अन्यायांच्या विरोधात जनआंदोलन करणार !

सैलानी यात्रा महोत्सवाचे नियोजन करावे-   पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा८ ते २३ मार्च दरम्यान यात्रा महोत्सव ४-५ लाख भाविक येण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या,नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन