vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

रोहयो’ अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती द्यावी- रोहयो, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

 

राज्य प्रतिनिधी : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार होईल यासाठी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती द्यावी, असे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भारत गोगावले यांनी सांगितले.

मंत्रालयात मनरेगा अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सचिव गणेश पाटील, उपसचिव ज. जि. वळवी तसेच विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कुशल आणि अकुशल कामांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच धडक सिंचन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निधीच्या अडचणी असल्यास तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री. गोगावले यांनी दिले.

 पीटीओची (प्रोजेक्ट टेक्निकल ऑफिसर) माहिती सादर करण्याचे तसेच राबविण्याचे विभागातील विविध विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात आणि १०० दिवसांत पूर्ण करावयाच्या कामांना अधिक गती देण्याचे निर्देश रोहयो मंत्री गोगावले यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री यांचा अतिवृष्टीग्रस्त भागांना दौरा; तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश    – ना.मकरंद पाटील

पोषण महिना अभियान रायगड जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी सलग तीन वर्ष रायगड जिल्हा राज्यात प्रथम पाच क्रमांकात जिल्हा परिषदेचा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री मकरंद पाटील यांची तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..जिल्ह्याचे पालकमंत्री दर पंधरा दिवसात असणार जिल्ह्यात…

५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप चषक सातारा व कोल्हापूर पुरूष गटाला विभागून तर महिलांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बाजी ५० व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता भव्य समारोपीय समारंभातून संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सचिन आडे पाटील

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने बिहार विधानसभेच्या विजयाचा जल्लोष…

vishwatmaklokswamivarta