vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ यात्रोत्सवानिमित्त वाहतुक मार्गात बदल..

महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ यात्रोत्सवानिमित्त वाहतुक मार्गात बदल..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर येथे मोठी यात्रा दि.२५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयोजीत होते. या कालावधीत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता धुळे सोलापुर महामार्ग व खुलताबाद ते फुलंब्री मार्गावरील जड वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-

१. छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड, वेरुळ , खुलताबाद, दौलताबादकडे जाणारी जड वाहतुक छत्रपती संभाजीनगर –शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी- कसाबखेडा फाटा-वेरुळ बायपास मार्गे- कन्नडकडे जाईल.

२. कन्नडकडून –वेरुळ, खुल्ताबाद, दौलताबाद व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी जड वाहतुक कन्नड-वेरुळ बायपास- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडा, शरनापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.

३. फुलंब्रीकडून- सुलतानपूर, खुलताबाद, वेरुळकडे जाणारी जड वाहतुक फुलंब्री- छत्रपती संभाजीनगर- शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी – कसाबखेडा फाटा- वेरुळ बायपास मार्गे कन्नडकडे जातील.

हे आदेश दि.२५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत लागू राहतील. या कालावधीत खुलताबाद ते वेरुळ या परिसरात जड वाहतुक बंद ठेवण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

ठाणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कार २०२२-२३ व २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची तीव्र प्रतिक्रिया; अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी तात्काळ पुढाकार,उपसभापती कार्यालयात अर्पण करण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आशिर्वादामुळेच मला केंद्रीयमंत्री पदाची संधी मिळाली – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले अधोरेखित, यामुळे एआय-फर्स्ट पायाभूत सुविधा, स्वच्छ ऊर्जा आणि उच्च-मूल्य असलेल्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल विशाखापट्टणममध्ये गुगलने 15 अब्ज डॉलर्सच्या एआय हबची घोषणा केली – विकसित भारत दृष्टिकोनाशी सुसंगत एआय-चालित सेवांना चालना देण्यासाठी भारतातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वेमार्ग आणि जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचं लोकार्पण