vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

बॉलीवूड प्रतिनिधी

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभावी खलनायकांपैकी एक आणि ‘गजनी’ चित्रपटातील ‘गजनी धर्मात्मा’ या अजरामर भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या पाच वर्षांपासून ते ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक दमदार चरित्र अभिनेता आणि खलनायकी भूमिकांचा हुकमी एक्का गमावला आहे.

२१ जानेवारी १९५२ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जन्मलेल्या प्रदीप रामसिंह रावत यांना लहानपणापासूनच रंगभूमीची आवड होती. स्थानिक नाटकांमधून अभिनयाची सुरुवात केल्यानंतर ते मुंबईत आले. १९८५ मध्ये ‘मेरी जंग’ चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील ‘अश्वत्थामा’ या भूमिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली

त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा ठरला तो ‘गजनी’. तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही आवृत्त्यांमध्ये त्यांनी साकारलेला ‘गजनी धर्मात्मा’ हा भारतीय सिनेमातील सर्वाधिक लक्षात राहणाऱ्या खलनायकांपैकी एक मानला जातो. ‘सरफरोश’, ‘लगान’, ‘बादशाह’, ‘आवारा पागल दीवाना’ यांसह हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या

पडद्यावर धाकदायक वाटणारे प्रदीप रावत प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत शांत, शिस्तप्रिय आणि मनमिळावू होते. ‘अश्वत्थामा’पासून ‘गजनी धर्मात्मा’पर्यंतचा त्यांचा अभिनयप्रवास भारतीय चित्रपटसृष्टीत कायम स्मरणात राहील. या अष्टपैलू आणि अविस्मरणीय कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.

संबंधित पोस्ट

औद्योगिक कंपन्यांमधून मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या रोजगार संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घ्यायला हवा – धनंजय साजेकर रोजगार मेळाव्यात १२० उमेवारांची नावनोंदणी

आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम,नागरिकांसाठी उपयुक् -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुंबई उपनगर जिल्ह्यात मोहिमेस उत्साहात सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत –जिल्हाधिकारी किशन जावळे

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांचा महासभेत सत्कार महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते कमिटीचा सन्मान

डहाणू तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामात झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई – मंत्री गुलाबराव पाटील