vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, प्रतिनिधी : ‘महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’च्या दोन खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथे झाले. ही पुस्तिका राज्य प्रशासनासाठी एक अभूतपूर्व व महत्त्वपूर्ण पाऊल असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘कर्मयोगी भारत’ या उपक्रमाला बळ देणारी आहे, असे सांगून अधिकर्त्यांबरोबरच नागरिकांना देखील ही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व इतर महसूल अधिकारी यांना विविध कामे करताना सुलभतेसाठी कायदे व नियम यासंदर्भातील हँडबुक तयार करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला होता. त्यानुसार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे तसेच कोकण विभागाचे सहायक आयुक्त रविंद्र पवार यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या हस्तपुस्तिकांच्या कामाचे कौतुक केले.

विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या दोन खंडांमध्ये महसुली कामे (खंड 1) आणि बिगर महसुली कामे (खंड 2) यांचा समावेश असून एकूण 24 प्रकरणे असल्याची माहिती दिली.

०००००

संबंधित पोस्ट

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

सुरक्षा रक्षकांच्या पोशाखाच्या रंगाबाबत गृह विभागाची संमती घेऊनच निनिश्चिती-कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

अंमली पदार्थांची वाढती तस्करी, अनधिकृत बांधकामे यांचेवर कारवाई न झाल्यास २ सप्टेंबरलाआझाद मैदानात आंदोलन..

राहुल गांधी यांची संसद सदस्यत्व रद्द करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका..

vishwatmaklokswamivarta

मानवतेच्या भल्यासाठी काम करण्यावर भारताचा विश्‍वास असून आम्ही कायमच मैत्री आणि सहकार्यासाठी तयार आहोत, असे प्रतिपादन परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी

vishwatmaklokswamivarta

पुढचे 3 दिवस पावसाचे, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट …