vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध..

लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध..

 

मुंबई : प्रतिनिधी- भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध राहील. सरकारने जर आमच्या पार्टीच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, कृषिविषयक, सांस्कृतिक, राजकीय, संदर्भातील मागण्या मान्य केल्या नाही तर १५ जून रोजी आंदोलन करून समाजाला न्याय मिळवून देऊ असा इशारा पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष रितेश सालेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

छत्रपति शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून आमचा पक्ष आपली वाटचल करील असे उपाध्यक्ष वेदप्रकाश मिश्र यांनी सांगितले. तर महाराष्ट्र सरचिटणीस आनंद शेरावत म्हणाले, सामाजिक आणि आर्थिक बदलाद्वारे दुर्बल घटकांचे शोषण आणि वंचितांवरील दडपशाही संपवण्याची चळवळ आपला पक्ष करील. पार्टीचे सल्लागार पराग मानेक म्हणाले, वाढती, गुन्हेगारी, वाढता भ्रष्टाचार, याला आळा बसण्याऐवजी तो फोफावत चालला आहे तो रोखण्यासाठी वेळोवेळी सनदशीर मार्गाने आंदोलनाद्वारे त्यास विरोध केला जाईल.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडी धारकांना ५००चौ. फु.चे घर देण्यात यावे. ८०० फुटापर्यंत घराला मालमत्ता कर माफ करावा.

मुंबईमध्ये अनेकवर्षे रखडलेले एसआरए प्रकल्प सरकारने स्वतः हाती घेऊन रहिवाशांना न्याय द्यावा. मुंबईती अतिक्रमणे हटवावीत. ट्रॅफिक च्या समस्यांपासून जनतेला मुक्ती मिळावी. युवकांना २० लाखांपर्यंत विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. ज्येष्ठ नागरिकांना प्रति महिना १० हजार रूपये सन्मान वेतन देण्यात यावे. सामान्य नागरिकाला जलद न्याय मिळवा यासाठी न्यायालयांची संख्या वाढवावी. ड्रग्जचा वापर वाढत असून तरूण पिढीला ड्रग्जच्या या विळख्यापासून वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत. या मागण्या पार्टीने केल्या आहेत.

संबंधित पोस्ट

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई इथल्या प्रादेशिक केंद्राने पंढरीची वारी पदयात्रेच्या माध्यमातून शारिरीक तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक सलोख्याचा केला प्रसार घोषणा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून फिट इंडिया चळवळीला दिले प्रोत्साहन

vishwatmaklokswamivarta

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे व २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे तर, २१ वर्षे मुदतीचे ५३० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस* *सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी* -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

vishwatmaklokswamivarta

मुख्य सचिव तथा ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे 100 दिवस कृती आराखडा आढावा बैठक संपन्न..जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्प गतीने पूर्ण करावेत-मुख्य सचिव तथा पालक सचिव सुजाता सौनिक

vishwatmaklokswamivarta