vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

अमरावती, प्रतिनिधी : शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व पर्यावरण संतुलनासाठी मांजरखेड, ता. धामणगाव येथे बांबू परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले.या परिषदेला आमदार प्रताप अडसड, सरपंच पल्लवी देशमुख, नंदूभाऊ खेरडे, शैलेश खेरडे, बांबू लागवड तज्ज्ञ संजय चरपे, तालुका कृषी अधिकारी संचित भाकरे, रावसाहेब रोठे, प्रदिप जळीत आदी उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, बांबू लागवडीकडे पंजाब आणि अमेरीकेसारख्या देशाने दुर्लक्ष केले आहे. बांबूमध्ये कार्बनचे प्रमाण कमी करण्याची क्षमता आहे. बांबूचे विविध उपयोग होत आहे. बांबूपासून कपडे, शाल तसेच लोणचेही बनविता येते. मात्र आपल्याकडे याची माहिती आणि महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. आपल्या क्षेत्रात बांबू नसल्याने त्यावर आधारीत उद्योगही कमी आले आहेत. बांबूची लागवड झाल्यास उद्योग येण्यास मदत होणार आहे. रोजगार हमी योजनेतून बांबूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चार वर्षात सात लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाल्याकाठी बांबू लागवड करावी. यामुळे जमिनीला पकड राहत असल्याने बांबूचा उपयोग पूर प्रतिबंधक म्हणून होतो. त्यासोबतच वादळाचा सामना करण्यासाठीही बांबू उपयोगी पडत असल्याचे सांगितले.

०००

संबंधित पोस्ट

आधाता ट्रस्ट तर्फे ज्येष्ठांची कानाची निगा व उपचार मार्गदर्शन संपन्न

vishwatmaklokswamivarta

आरक्षण सोडत – हरकती व सूचना 17 ऑक्टोबरपर्यंत स्वीकारणार- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

आपत्ती व्यवस्थापनासाठी कोंकण विभाग सज्ज“शून्य अपघात हे आपले ध्येय” प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर· ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ

वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रथम सत्रासाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची 10 जून मुदत..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेराज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांना प्रचंड प्रतिसाद-निवडणुका असो अथवा नसो पक्ष संघटन अत्यंत महत्वाचे – अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta