vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

22 एप्रिल रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

     नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत बुधवार दिनांक 22/04/2026 रोजी सी. बी. डी. सेक्टर-28 पंप हाऊस येथे मॅनिफोल्ड व व्हॉल बसविणे तसेच कळंबोली सर्कल, नेरुळ सेक्टर-19 वंडरपार्क येथील जलवाहिनीवर व्हॉल बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहे. तसेच घणसोली से-2 येथील 900 मी.मी. व्यासाची पाईपलाईन जोडण्याच्या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा हा बुधवार दि.22/04/2026 रोजी बंद राहणार आहे.

          त्यासाठी बुधवार दि. 22/04/2026 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत 12 तासांकरीता मुख्य जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

          त्यामुळे सदर कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात तसेच नमुंमपा क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोड मधील पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे बुधवार दि. 22/04/2026 रोजी संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व गुरुवार दि. 23/04/2026 रोजी सकाळचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

          तरी या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे

00000

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीमगर्जना’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन**कल्याण येथे भीम गीतांच्या माध्यमातून मानवंदना; सांस्कृतिक कार्य विभागाचा प्रेरणादायी उपक्रम*

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त जनजागृती प्रश्नमंजूषा 2025‘मायगॉव्ह’ (MyGov) मंचावर मराठीसह 11 भाषांमध्ये उपलब्‍ध..

vishwatmaklokswamivarta

हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम”शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाची तयारी सुरू 21 डिसेंबर रोजी होणार खारघर येथे भव्य कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

कौशल्य आत्मसात करा, आत्मविश्वासाने पुढे जा – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर**लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप अकादमीतील विद्यार्थ्यांशी साधला थेट संवाद*उद्योगाभिमुख प्रशिक्षणातून स्थानिक तरुणांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी

आरटीई’ प्रवेशासाठी मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज*

vishwatmaklokswamivarta

ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” (DEAF) बाबत बँकांकडून विशेष मोहिमेचे आयोजन,दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठ ठाणे जिल्ह्यातील 11 लाख 38 हजार 421 खातेदारांना आवाहन

vishwatmaklokswamivarta