vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पनीरच्या नावाखाली ॲनालॉगचा वापर- आढळल्यास आता थेट कारवाई

पनीरच्या नावाखाली ॲनालॉगचा वापर- आढळल्यास आता थेट कारवाई

जालना, प्रतिनिधी :- हॉटेलमध्ये चवीने पनीर टिक्का किंवा पनीर बटर मसालाच्या डिशमध्ये तुम्ही नक्की काय खाताय, याचा आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पनीरच्या नावाखाली स्वस्त दरातील चीज ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रेस्टॉरंट आणि हॉटेल चालकांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. ॲनालॉगचा वापर आढळल्यास थेट कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त श्रीधर डुबे पाटील यांनी दिले आहेत

शाकाहारी खवय्यांसाठी पनीर हा प्रथिनांचा मुख्य स्रोत मानला जातो. मात्र, वाढत्या नफेखोरीसाठी काही व्यावसायिक दुधापासून बनवलेल्या अस्सल पनीरऐवजी खाद्यतेल, स्टार्च आणि इमल्सिफायर वापरून तयार केलेले ॲनालॉग ग्राहकांच्या ताटात वाढत आहेत. हे दिसायला पनीरसारखेच असले तरी त्याचे पोषणमूल्य दुधाच्या पनीरपेक्षा पूर्णपणे वेगळे असते.

अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता हे स्वस्त पर्याय वापरले जात आहेत. यावर प्रतिबंध लावण्यासाठी प्रशासनाने आता नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये जर हॉटेलमध्ये ‘ॲनालॉग’ वापरले जात असेल, तर त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यूकार्ड किंवा डिस्प्ले बोर्डवर करावा लागेल. विक्री बिलावर केवळ पनीर न लिहिता डेअरी ॲनालॉग असा स्पष्ट उल्लेख करणे आता बंधनकारक आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या ऑनलाइन परवाना अर्जामध्ये स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक तात्काळ अपडेट करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नागरिकांनी पॅक बंद पनीर खरेदी करताना त्यावरील घटक नीट वाचून खात्री करा. सुटे पनीर घेताना ते शुद्ध दुधाचे असल्याची खात्री करा आणि संशय आल्यास पक्के बिल मागायला विसरू नका. ऑर्डर देण्यापूर्वी हॉटेलमध्ये पनीर आणि ॲनालॉग असे स्वतंत्र पर्याय आहेत का, याची विचारणा करावी. जर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले, तर ग्राहकांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी यांनी केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

राज्यात नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला 

अभय योजनेचा लाभ घेण्याची 31 मार्च शेवटची संधी !थकबाकीवर ५० टक्के शास्ती माफी ३१ मार्च २०२६ रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच मिळणार!

शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशाेत्सव साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाट गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीची बैठक

अमृतकाळात भारताला आर्थिक सुबत्ता देणारा आणि पर्यायी इकोसिस्टीम निर्माण करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस‘अमृतकाळ विकसित भारत-२०४७ परिषदे’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष आज ‘ श्री ‘ ची होणार प्राणप्रतिष्ठा स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनासह सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी