पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद
मुंबई प्रतिनिधी-पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे प्रवासी जलवाहतूक २६ मे ते ३१ ऑगस्टदरम्यान सेवा राहणार बंद आय. व्हि. अॅक्ट १९१७ अन्वये पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा दिनांक २६ मे २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल हवामान, भरती-ओहोटी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित कंपनी व संस्थांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या कालावधीत मांडवा-गेटवे मार्गावरील जलवाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.