vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण

मुंबई, प्रतिनिधी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा २३ वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून वितरित करण्यात आला. राज्यातील ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यात सुमारे ₹१,८१७ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

मुंबई येथून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार देण्यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात २३ व्या हप्त्याचा लाभ थेट जमा करण्यात आला असून यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेवर वितरित केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांतर्फे आभार व्यक्त करतो.”

महाराष्ट्रातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २२ हप्त्यांद्वारे सुमारे ₹४१,०८३ कोटींचा लाभ वितरित करण्यात आला आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्यात राज्यातील भूमी अभिलेख अद्ययावत, आधार संलग्न बँक खाते व ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकरी कुटुंबांना सुमारे ₹१,८१७ कोटींचा लाभ थेट हस्तांतरणाद्वारे मिळणार आहे.पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना तसेच सहकारी संस्थांमध्ये आयोजित करण्यात आले.

केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

पीएम किसान योजेनेचे सर्वाधिक लाभार्थी असलेले जिल्हेअहिल्यानगर (लाभार्थी 5,45,481 व एकूण रक्कम 109.32)सोलापूर (लाभार्थी 4,94,447 व एकूण रक्कम 98.89)कोल्हापूर (लाभार्थी 4,60,687 व एकूण रक्कम 92.19)सातारा (लाभार्थी 4,36,055 व एकूण रक्कम 87.22)पुणे ( लाभार्थी 4,30,519 व एकूण रक्कम 86.10)नाशिक (लाभार्थी 4,26,540 व एकूण रक्कम 85.34)

0000

संबंधित पोस्ट

चिकू फळपिकविमा नोंदणीसाठीशेवटच्या पाच दिवसांची मुदत..

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व जिल्हाधिकारी रायगड यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय अडचणी, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शुक्रवारी सांगलीत,उरूण ईश्वरपूरमध्ये शनिवारी पदयात्रा…

vishwatmaklokswamivarta

परळीतील महापशुधन एक्स्पोचे १३ फेब्रुवारीला मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १४ फेब्रुवारी रोजी उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी -मंत्री मंगलप्रभात लोढा§ जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार§ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार.