vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भूतपूर्व सैनिक व भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भरती मेळावा

भूतपूर्व सैनिक व भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भरती मेळावा

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक तसेच वने व हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC) आणि राज्य वन विभागातील भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) इको महारमध्ये भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी निर्धारित दिनांक, वेळ व ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरती मेळावा दोन टप्प्यांत होणार असून पहिला टप्पा 1 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआय, कोल्हापूर येथे, तर दुसरा टप्पा 8 ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत एआरओ ग्राउंड, छत्रपती संभाजीनगर येथे दररोज सकाळी 5 वाजल्यापासून होणार आहे.

भरतीसाठी रिक्त पदे जेसीओ – 4 आणि सोल (जीडी) – 162 पदे केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. तसेच ट्रेड्समन – 15, सोल क्लार्क (जीडी) – 7, हेअर ड्रेसर – 1, मेस कीपर – 1, स्टिवर्ड – 1, हाऊस कीपर – 1, शेफ कम्युनिटी – 2 आणि वॉशरमन – 2 अशी पदे संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

भरतीसाठी उमेदवार हा सशस्त्र दलातील निवृत्तिवेतनधारक भूतपूर्व सैनिक किंवा वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागात किमान 20 वर्षे सेवा केलेला भूतपूर्व महिला कर्मचारी असावा. सेवानिवृत्ती अथवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी ‘शेप-1’ असावी, चारित्र्य अनुकरणीय अथवा अतिशय चांगले असावे आणि कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी प्रकरणात सहभाग नसावा.

भरतीसाठी उमेदवारांनी मूळ पीपीओ (निवृत्तिवेतन आदेश), मूळ डिस्चार्ज बुक व त्याची स्वयं-साक्षांकित प्रत, अधिवास प्रमाणपत्र, भूतपूर्व सैनिक ओळखपत्र, अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराची 10 छायाचित्रे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावीत.

भूतपूर्व सैनिकांसाठी कागदपत्र पडताळणी, एक मैल धाव, पुल-अप्स, बॅलन्स बीम, मुलाखत, वनीकरण व रोपवाटिकेशी संबंधित प्रावीण्य चाचणी आणि वैद्यकीय तपासणी अशी निवड प्रक्रिया राहणार आहे. भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी कागदपत्र पडताळणी, मुलाखत, वनीकरण व रोपवाटिकेतील प्रावीण्य चाचणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.शारीरिक पात्रतेनुसार भूतपूर्व सैनिकांसाठी किमान उंची 160 सेंमी (गोरखा, गढवाली व आसामी उमेदवारांसाठी 152 सेंमी), तर भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 150 सेंमी निश्चित करण्यात आली आहे. भूतपूर्व सैनिकांचे किमान वजन 50 किलो, महिला उमेदवारांचे किमान वजन 42 किलो असावे. छातीचे माप भूतपूर्व सैनिकांसाठी 82 सेंमी व किमान 5 सेंमी विस्तार, तर महिला उमेदवारांना किमान 5 सेंमी छाती विस्तार करता येणे आवश्यक आहे.

निवड गुणवत्ता व रिक्त पदांच्या आधारे करण्यात येणार असून इको टेरिटोरियल आर्मीमधील सेवा निवृत्तिवेतनास पात्र राहणार नाही. प्रारंभी दोन वर्षांसाठी नियुक्ती देण्यात येईल. कामगिरी समाधानकारक असल्यास एक वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. भूतपूर्व सैनिक जेसीओंना 55 वर्षांपर्यंत, तर भूतपूर्व सैनिक शिपायांना 50 वर्षांपर्यंत सेवा करता येईल. निवड झाल्यानंतर देशात कुठेही सेवा करण्याची तयारी ठेवावी लागेल. भूतपूर्व सैनिकांचे विद्यमान निवृत्तिवेतन मात्र अबाधित राहीलभरती प्रक्रियेदरम्यान मोबाईल फोनला परवानगी नसून भरती पूर्णपणे विनामूल्य आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही दलालांच्या किंवा आमिषांच्या भूलथापांना बळी पडू नये. लाच देणे अथवा खोटी कागदपत्रे सादर करणे, माहिती लपविणे किंवा कागदपत्रांमध्ये छेडछाड करणे आढळल्यास उमेदवारी तत्काळ रद्द करण्यात येईल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निर्धारित दिनांक, वेळ व ठिकाणी उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.अधिक माहितीसाठी 9168168136 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

कोकण विभागातील पहिला ‘अमृत आनंद मेळा वरसोली अलिबाग येथे उत्साहात संपन्न

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर,मराठी आणि सिंधी भाषेसाठी महाराष्ट्रातील युवा साह‍ित्यिकांची निवड तर डॉ. सुरेश सावंत यांना ‘आभाळमाया’ याठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहिर

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘कसं काय?’ मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ