vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

रायगड प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी https://raigad.gov.in या संकेत स्थळावरून देण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांसह आपला अर्ज दि.15 मे 2025 रोजी सायं. 06.15 वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येईल. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद 10 हजार लोकसंख्येसाठी 2 केंद्र स्थापन करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना “आपले सरकार सेवा केंद्र” हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडींग करण्यात आले आहे.

तरी नवीन आपले सरकार सेवा केंद्राचा अर्ज भरते वेळी तांत्रिक अडचणी असल्यास जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा.आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी कालावधी 30 दिवस, दि.16 एप्रिल ते दि.15 मे 2025 पर्यंत. प्राप्त आपले सरकार सेवा केंद्राच्या मागणी अर्जांची छाननी कालावधी 15 दिवस, दि.16 मे ते दि.30 मे 2025 पर्यंत. प्राप्त आपले सरकार सेवा केंद्राच्या मागणी अर्जांवर जिल्हास्तरीय कार्यवाही करिता छाननी कालावधी 15 दिवस, दि.02 जून  ते दि.16 जून 2025 पर्यंत.

000000

संबंधित पोस्ट

सिक्कीम येथे भुस्खलनामुळे अडकलेल्या राज्यातील प्रवाशांचा पुढील प्रवास सुखरूपणे सुरू – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

गडचिरोलीत मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**मत्स्य संगोपन प्रात्यक्षिक प्रकल्पाचे उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठीही महाराष्ट्र महत्वाचे केंद्र- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू· वाढवण बंदराभोवती नवीन शहर टियर 2 आणि 3 शहरांचा औद्योगिक कायापालट· महाराष्ट्र २०२९ चा कृती आराखडा लवकरच..

vishwatmaklokswamivarta

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta