vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत

रायगड प्रतिनिधी- रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी https://raigad.gov.in या संकेत स्थळावरून देण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांसह आपला अर्ज दि.15 मे 2025 रोजी सायं. 06.15 वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येईल. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद 10 हजार लोकसंख्येसाठी 2 केंद्र स्थापन करण्यात येईल.

महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना “आपले सरकार सेवा केंद्र” हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे ब्रँडींग करण्यात आले आहे.

तरी नवीन आपले सरकार सेवा केंद्राचा अर्ज भरते वेळी तांत्रिक अडचणी असल्यास जिल्हा माहिती तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा.आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी कालावधी 30 दिवस, दि.16 एप्रिल ते दि.15 मे 2025 पर्यंत. प्राप्त आपले सरकार सेवा केंद्राच्या मागणी अर्जांची छाननी कालावधी 15 दिवस, दि.16 मे ते दि.30 मे 2025 पर्यंत. प्राप्त आपले सरकार सेवा केंद्राच्या मागणी अर्जांवर जिल्हास्तरीय कार्यवाही करिता छाननी कालावधी 15 दिवस, दि.02 जून  ते दि.16 जून 2025 पर्यंत.

000000

संबंधित पोस्ट

जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे तातडीने स्थलांतर करणार- वनमंत्री गणेश नाईक,वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी महत्वाचे निर्णय-त्वरित 200 पिंजरे बसविणार, आणखी 1 हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करणार नागरिकांच्या जीवित रक्षणासाठी निधी कमी पडू देणार नाही· बिबट्यांच्या हालचालीची माहिती देण्यासाठी एआयचा वापर करणार· नसबंदीसाठी केंद्रीय वन मंत्र्यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार· शेती व गोठ्यांना सौर कुंपण करणार

vishwatmaklokswamivarta

गॅस वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील 

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व; जात वैधता-प्रमाणपपत्र पडताळणी मोहिम दि.४ जुलैपर्यंत..

रासायनिक दुर्घटनेचे आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक; ३०० जणांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह, राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी होणार उपलब्ध

महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’ भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजी* ग्रामीण भागातील गुणवंत आता होणार ‘आयएफएस’ अधिकारी* ‘महाज्योती’च्या प्रशिक्षणातून १०० अधिकारी घडण्याचा नवा विक्रम..