vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

स्टॅंड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

स्टॅंड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    सांगली, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनामार्फत विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून दिला जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण, सांगली चे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटाकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या नवउद्योजकांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून स्टॅंड अप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज मंजूर करून घेतले आहे, त्यांनी संबंधित बँकेचे शिफारस पत्र व आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली (जुना बुधगाव रोड, सांगली) येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा सन्मान करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र’ आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अध्यासन’ केंद्राचे उद्घाटन

माजी सैनिकांसाठी डेटा डिजिटायझेशनसाठी नोंदणी बंधनकारक…

vishwatmaklokswamivarta

राज्यात सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, केवळ प्री पेड मीटर ग्राहकांनाच ऐच्छिक असेल – ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर. 

समुद्र किनारी समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण  वाचविणाऱ्या रायगड पोलीस दलातील दोन्ही पोलीस अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती ऑंचल दलाल यांनी प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव 

माझे गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचा १ एप्रिलपासून नांदेड जिल्ह्यात शुभारंभजिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांचे प्रभावी अंमलबजावणीचे आदेश..

शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा संपन्न परिपाठ ते गृहपाठ पर्यंत विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाची संधी द्या. – जिल्हाधिकारी- डॉ. किरण पाटील