vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या वाईट परिस्थितीला सामोरी. तिच्यासह तिच्या कुटुंबियांनाही धमक्या,अशात एका मराठमोळ्या कलाकाराने ट्विट करत क्रांतीला पाठिंबा

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या वाईट परिस्थितीला सामोरी जात आहे. तिच्यासह तिच्या कुटुंबियांनाही धमक्या मिळत आहेत. अशात एका मराठमोळ्या कलाकाराने ट्विट करत क्रांतीला पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई- प्रतिनिधी  आर्यन खान ड्रग प्रकरणात महत्वपूर्ण कामगिरी करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी आणि लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. समीर यांच्यावर निरनिराळे आरोप होत आहेत. या संपूर्ण मानसिक त्रासाला क्रांती अतिशय धीराने सामोरी जात आहे. परंतु, या संपूर्ण प्रकरणात मराठी चित्रपटसृष्टीतील एकही कलाकार क्रांतीच्या बाजूने बोलण्यास तयार नसल्याचं चित्र आहे. मराठी कलाकारांपैकी कुणीही क्रांतीला जाहीरपणे पाठिंबा दर्शवला नसल्याने या गोष्टीचं वाईट असल्याचं ट्विट लोकप्रिय अभिनेता आरोह वेलणकर याने केलं आहे.

क्रांतीने तिला मिळणाऱ्या धमक्या आणि समीर यांच्यावर केले जाणारे आरोप याबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिचं म्हणणं स्पष्टपणे मांडलं. क्रांती म्हणाली, ‘मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मला महाराष्ट्रातून, देशभरातून पाठिंब्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण मला आणि माझ्या कुटुंबाला माझ्याच राज्यात कुणीतरी त्रास देतंय हे वाईट आहे. मला माझ्या राज्यात सुरक्षित वाटायला हवं ना?’ अशी प्रतिक्रिया क्रांतीने व्यक्त केली. यावर आरोहने ट्विट करत तिला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. सोबतच इतर कलाकारांबद्दल वाईट वाटत असल्याचं देखील म्हटलं आहे. आरोहने ट्विट करत लिहिलं, ‘क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इण्डस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहीत आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.’

यासोबतच मराठी अभिनेत्री सोनाली खरे हिनेदेखील क्रांतीची बाजू घेत समीर वानखेडे यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. आता सोनालीपाठोपाठ बिग बॉस विजेती मेघा धाडे हिनेदेखील क्रांतीला पाठिंबा दिला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यात तणावग्रस्त परिसरात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

ज्ञानवापी मशिद ‘व्यास तळघरा’तील पूजा कायम, अलाहबाद हायकोर्टाने फेटाळली विरोधातील याचिका

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम’सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करावे’ – मुख्यमंत्री

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

उच्च न्यायालयात सिंहगडएक्स्प्रेसच्या थांब्यासाठी-अशी मागणी पुणे प्रवासी संघाने केली