vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता,उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली असावी

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता,उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केलेली असावी

रायगड,द प्रतिनिधी:-एकीकडे बेरोजगारी वाढत आहे तर दुसरीकडे चांगले मनुष्यबळ अनेक आस्थापनांमध्ये, कंपन्यांमध्ये मिळत नाही. अशा परिस्थितीत उमेदवारांचे कौशल्य विकसित होणे आवश्यक आहे. उद्योजक घडल्यास ते काही लोकांना रोजगार देऊ शकतात. त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होते. उद्योजकांना चांगले कर्मचारी मिळावेत, तसेच इच्छुक बेरोजगारांना काम मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना सुरू करण्यात आली असून उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/ संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अ.मु.पवार यांनी दिली आहे.

उमेदवारांना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम योजना आपल्यासाठी करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) द्वारे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येते. तो कुशल, अनुभवी झाल्यानंतर त्याला चांगल्या संधी उपलब्ध होतात. रायगड जिल्यातील खाजगी आस्थापनांनी त्यांच्या मनुष्यबळाच्या उत्पादन क्षेत्रासाठी 10 टक्के व सेवाक्षेत्रासाठी 20 टक्के रिक्तपदे अधिसुचित करावीत.

वैशिष्ट्ये : https://www.cmykpy.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर Intern Login मध्ये बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना आदींना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदविली जाते.- सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) च्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतात.

शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन (प्रतिमहिना), 12 वी पास- 6 हजार, आय. टी. आय./पदविका- 8 हजार, पदवीधर / पदव्युत्तर-10 हजार, या कार्य प्रशिक्षण (इंटर्नशिप) चा कालावधी 6 महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. विद्यावेतन लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.

उमेदवारांची पात्रता:- उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/ आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर असावी. तो महाराष्ट्राचा अधिवासी असावा. आधार नोंदणी असावी. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02141-222029 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.०००

संबंधित पोस्ट

डॉ बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी स्मारक कामाची केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे संत रविदास महाराजांचे स्मारक ठरणार समाजासाठी प्रेरणास्थान: खासदार कल्याण काळे-जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीतर्फे भव्य स्मारकासाठी साकडे; सामाजिक समरसता आणि एकतेचा जागर करण्याचा खासदारांचा निर्धार

बोरघाट महामार्गावर जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

स्वातंत्र्यदिनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा गावागावातील आरोग्य समित्यांच्या सदस्यांशी थेट ऑनलाइन जनसंवाद आरोग्य व्यवस्थेमध्ये लोकसहभाग वाढविण्यावर भर

आठवी आर्थिक गणना; प्रशासनाची पूर्वतयारी सुरु

vishwatmaklokswamivarta