vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी

जालना, (प्रतिनिधी)-जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि ‘आत्मा’ च्यावतीने नुकतेच पाच दिवसीय जिल्हा कृषी प्रदर्शन आजाद मैदान येथे पार पडले.या शेतकरी महोत्सवामध्ये जालना तालुक्यातील पाचनवडगाव येथील बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वतीने एका दालनामध्ये विषमुक्त धान्य व भाजीपाला ठेवण्यात आला होता. याला जालन्यातील नागरिकांसह शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला.या आगळ्या वेगळ्या सेंद्रीय अन्न धान्य उत्पादन करणार्‍या बिजांकुर कंपनीने सेंद्रीय गहु, ज्वारी, जवस हे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या दालनास जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे, आत्माचे संचालक अमोल आगधने, जे.पी.शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी यांनी भेट देऊन कंपनीच्या उत्पादनांची पाहणी करून कौतूक केले.या प्रदर्शनात बिजांकुर कंपनीचे संचालक रामकिसन वायाळ, नामदेव नागवे,

संतोष काकडे, विश्वंभर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी; प्रशासनाकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम-विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र…

3700 प्रगणक व पर्यवेक्षक यांना 15 दिवसीय जनगणना प्रशिक्षण**नागरिक घरबसल्या स्वत:ही करू शकतात ऑनलाईन स्व-नोंदणी* 

लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत क्षेत्रात 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’ला ऐतिहासिक उड्डाण मुख्यमंत्र्यांकडून विमानतळावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्राम विकासासाठी शासन व खासगी भागीदारांनी एकत्र येऊन परिवर्तन घडविण्याचे आवाहन