vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी

जालना, (प्रतिनिधी)-जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि ‘आत्मा’ च्यावतीने नुकतेच पाच दिवसीय जिल्हा कृषी प्रदर्शन आजाद मैदान येथे पार पडले.या शेतकरी महोत्सवामध्ये जालना तालुक्यातील पाचनवडगाव येथील बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वतीने एका दालनामध्ये विषमुक्त धान्य व भाजीपाला ठेवण्यात आला होता. याला जालन्यातील नागरिकांसह शेतकर्‍यांनी मोठा प्रतिसाद दिला.या आगळ्या वेगळ्या सेंद्रीय अन्न धान्य उत्पादन करणार्‍या बिजांकुर कंपनीने सेंद्रीय गहु, ज्वारी, जवस हे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या दालनास जिल्हा कृषी अधीक्षक गहिनीनाथ कापसे, आत्माचे संचालक अमोल आगधने, जे.पी.शिंदे, दत्तात्रय सूर्यवंशी यांनी भेट देऊन कंपनीच्या उत्पादनांची पाहणी करून कौतूक केले.या प्रदर्शनात बिजांकुर कंपनीचे संचालक रामकिसन वायाळ, नामदेव नागवे,

संतोष काकडे, विश्वंभर कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

3000 हून अधिक नागरिक सहभागातून नवी मुंबई परिसरामध्ये महा स्वच्छता अभियान

प्राधान्य क्षेत्र ठरवून जिल्हा नियोजनमधून कामे करणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष देत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचा आदेश,सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या श्वानांना तात्काळ हटवून त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

जालना दर्गाह वक्फ मालमत्तेतील अनियमिततेवर त्वरित कारवाईची मागणी अर्जदारांचे व्यवस्थापन समितीला निवेदन

vishwatmaklokswamivarta

बोरघाट महामार्गावर जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना