आज तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांनी मोठया सख्येंन सहभागी व्हावे. -जिल्हाधिकारी सतोंष पाटील
सातारा, प्रतिनिधी सद्याच्या युध्दजन्य परिस्थितीत भरतीय सैन्य दलाने “ऑपरेशन सिंदुर” अंतर्गत दिलेले शौर्यपूर्ण योगदान समस्त देशवासीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.या पार्श्वभूमीवर,मा.ना.श्री शंभुराज शिवाजीराव देसाई मंत्री पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रशासणाच्या वतीने भरतीय सैन्य दलाचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांच्या मनोबलास बळकटी देण्यासाठी दिनांक २० मे २०२५ मंगळवार रोजी भव्य रॅली आयोजित करण्यात येत आहे.सदर रॅली सकाळी ९.०० वाजता गांधी मैदान सातारा येथुन सुरु होवुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पोवई नाका सातारा येथे समाप्त होईल .भारतीय सैन्यदलाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व देशभक्तीचा संदेश व्यापकपणे पोहचविण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.या उपक्रमात जिल्हा मुख्यालयातील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठया संख्येने सहभगी व्हावे .रॅलीमध्ये युवक मंडळे,शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी,समाजिक संस्था,निवृत्त सैनिक,महिला मंडळे व्यापारी व नागरीक राष्ट्रभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.