vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

ज्येष्ठ नागरिकांसाठीची राष्ट्रीय हेल्पलाईन“एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन

 

बुलढाणा,  (प्रतिनधी)सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी, सर्व राज्यांत “एल्डर लाईन 14567” हि टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आली आह

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फॉँऊडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फॉँऊडेशन द्वारे चालवली जात आहे. या राष्ट्रीय हेल्पलाइनचा उददेश हा भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विश्वासार्ह राष्ट्रीय हेल्पलाइन तयार करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणे तसेच अत्याचार ग्रस्त वृद्ध व्यक्तींची काळजी घेणे हा आहे. जेष्ठांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी निसंकोचपणे “एल्डर लाईन 14567” या टोल फ्री हेल्पलाईन यावर संपर्क साधावा आणि www.elderline.dosje.gov.in या संकेत स्थळावर भेट द्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आह

……असे चालते काम वृध्दांच्या समस्या जाणून त्यांचे निवारण व्हावे, म्हणून ही हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD), सामाजिक न्याय व विशेष सहास्य विभाग समाज कल्याण आयुक्तालय व जनसेवा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत आठवड्यातील सातही दिवस चालणा-या या सेवेच्या माध्यतून वृध्दाश्रम व आरोग्याची माहिती, कायदेविषयक मार्गदर्शन, आर्थिक, पेन्शन संबधित सल्ला, भावनिक आधार, कौटुंबिक वाद निवारण, पोलिस मदत, सरकारी योजनांसह व हरवलेल्या जेष्ठांचा शोध घेण्याच्या सेवा पुरविल्या जातात.……..या तक्ररींचे केले जाते निवारण

सुन खावु घालत नाही, मुलगा परदेशी असल्याने सांभाळ करीत नाही, गर्दीच्या ठिकाणी हरविणे, उदनिर्वाहचा प्रश्न, एकटाच आहे, संपत्ती पैशासाठी मुलांकडून त्रास अशा समस्येवर संस्था जेष्ठांसाठी काम करते.

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक !हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाचा मोठा विजय!**वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित;*मंत्री उदय सामंत यांची निर्मात्यांना कडक तंबी; नाव, पात्रे आणि संकल्पना बदलण्याचे आदेश..

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

जालन्यात 4 मार्चपासून वॉटरशेड यात्रा4 गावामध्ये विविध कार्यम्रम व उपक्रमांचे आयोजन..

सुधागडातील सर्व समाज एकत्र येणार! महाराष्ट्रातील सर्वात पहिलीच क्रांतिकारी घटना!!  

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.