vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी घेतले महाराष्ट्र सदनातील ‘ श्री ‘ चे दर्शन गणेश विसर्जनासाठी दिल्ली सरकारकडून ८५ कृत्रिम तलाव – परवेश वर्मा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी घेतले महाराष्ट्र सदनातील ‘ श्री ‘ चे दर्शन

गणेश विसर्जनासाठी दिल्ली सरकारकडून ८५ कृत्रिम तलाव – परवेश वर्मा.

नवी दिल्ली, प्रतिनिधी : महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी सदनातील ‘ श्री’ दर्शन घेतले. या वेळी निवासी आयुक्त आर. विमला यांनी त्यांचे स्वागत केले. स्वयंसहायता गटातील कारागिरांनी तयार केलेली पारंपरिक शॉल तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने त्यांना भेट म्हणून देण्यात आली. वर्मा यांनी हे उत्पादने पाहून समाधान व्यक्त केले आणि स्वयंसहायता गटाच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी उपमुख्यमंत्री वर्मा यांनी दिल्ली सरकारच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यमुना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने यंदा गणेश विसर्जनासाठी तब्बल ८५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. या उपक्रमामुळे भाविकांना इको-फ्रेंडली विसर्जनाची सोय उपलब्ध झाली असून, नदीच्या संरक्षणास मोठी मदत होईल, असे श्री वर्मा म्हणाले.

आज महाराष्ट्र सदनात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड येथील गायक धनंजय जोशी यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. श्री वर्मा यांनी या सोहळ्याचा आनंद घेत गणेशोत्सवाचा उत्साह, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले

000

संबंधित पोस्ट

एसटी महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन

धाकलगावात शंकरपटाचा थरार! बैलगाड्यांच्या वेगवान दौडीने प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध…

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

सह्याद्री व्याघ्र राखीव वन क्षेत्रातील पर्यटन आराखड्यातील कामांना गती द्या – जिल्हाधिकारी संतोष पाटील

जिल्हाधिकारी कार्यालयातमहात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये,लवकरात लवकर लागू करावेत कायदा आणि सुव्यवस्था बळकट करण्यासाठी गुन्हे नोंदवले जाणे आवश्यक,एफआयआर दाखल करण्यात विलंब होता कामा नये सात वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त दोषसिद्धी दर मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta