
पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट…
राज्य प्रतिनिधी-पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (#INCOIS) ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै रोजी सायं. ०५.३० पासून ते २६ जुलै २०२५ रोजी रात्री ०८.३० वाजेपर्यंत ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
00000
#पाऊस#मान्सून#हवामानअंदाज



