vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत..

राज्य प्रतिनिधी –

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मणिपूर सेवा समिती आणि सेवा भारती मणिपूर यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. थौबल जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी हाओखा गावातील सुमारे तीनशे कुटुंबांना तांदूळ, पिण्याचे पाणी, कपडे आणि इतर आवश्यक साहित्य वाटप केले.

पूरग्रस्त भागांत मदत पोहोचवण्यासाठी स्थानिक क्लब, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक समन्वय साधत आहेत. राज्य सरकारने इंफाळ ईस्ट, इंफाळ वेस्ट, थौबल, बिष्णुपूर आणि ककचिंग जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अनेक शासकीय कार्यालये व बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. काही भागांत वीज व पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर व असम रायफल्स यांची पथके बचाव व स्थलांतरासाठी तैनात करण्यात आली आहेत. प्रभावित गावांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून अन्नधान्य, औषधे व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट

हिंदु संत आणि महिला यांच्यावर अश्लाघ्य टीका करणारे प्रा. श्याम मानव यांचा ‘बुवा तेथे बाया’ हा कार्यक्रम रद्द करा !* – हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी 

जालना शहरातील भटक्या जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करणार जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत १७ फेब्रुवारी रोजी होणार मुंबई क्लायमेट वीक उपक्रमाची सुरूवात

पीककर्जासाठी शिबिरांचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आषाढीवारी 2025..!मानाच्या पालख्या, वारकरी अन्  भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट…

म्हाडा प्रमाणे एसआरएमध्येदेखील स्वयंपुनर्विकास योजना- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर