vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत..

राज्य प्रतिनिधी –

मणिपूरमध्ये आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मणिपूर सेवा समिती आणि सेवा भारती मणिपूर यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. थौबल जिल्ह्यातील स्वयंसेवकांनी हाओखा गावातील सुमारे तीनशे कुटुंबांना तांदूळ, पिण्याचे पाणी, कपडे आणि इतर आवश्यक साहित्य वाटप केले.

पूरग्रस्त भागांत मदत पोहोचवण्यासाठी स्थानिक क्लब, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक समन्वय साधत आहेत. राज्य सरकारने इंफाळ ईस्ट, इंफाळ वेस्ट, थौबल, बिष्णुपूर आणि ककचिंग जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अनेक शासकीय कार्यालये व बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. काही भागांत वीज व पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर व असम रायफल्स यांची पथके बचाव व स्थलांतरासाठी तैनात करण्यात आली आहेत. प्रभावित गावांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली असून अन्नधान्य, औषधे व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून दहा जणांची सुखरूप सुटका; भारतीय सैन्याचे पथक लवकरच दाखल होणार

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष लेख-माझा मराठाचि बोलु कौतुकें’

दादर, मुंबई येथे नवीन गुन्हे अन्वेषण मंडळ (CIB) या सामाजिक संस्थे कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

वाळवा तालुक्यात एमआयडीसी उभारण्यासाठी जागेचा सर्वे करावा-उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले निर्देश

जवाहर नवोदय विद्यालयातील दहावीचा निकाल 100 टक्के

विशेष लेख -‘डिजिटल महाराष्ट्र’च्या स्वप्नाला अमरावतीचे बळ; ई-गव्हर्नन्स मानांकनात अमरावती महानगरपालिकेचा राज्यात पाचवा क्रमांक!