vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जगात ज्ञान हीच संपत्ती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

जगात ज्ञान हीच संपत्ती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

      राज्य प्रतिनिधी   सातारा  पैसा म्हणजे संपत्ती नाही तर ज्ञान ही संपत्ती आहे. जग खूप वेगाने पुढे चालले आहे. परंतु ते ज्ञान अद्ययावत असले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंमलात आणले कारण ज्ञान हे बहुउद्देशिय असले पाहिजे, त्याचा कौशल्य विकास झाला पाहिजे. माणूस सर्वांगीण विकसित झाला पाहिजे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

   पाटण येथील कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण व्दारा बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या नवीन अभ्यासक्रमांचा, अद्ययावत संगणक प्रयोगशाळेचा व नवीन विस्तारित इमारतीचा उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आमदार डॉ. अतुल भोसले, सत्यजितसिंह पाटणकर, अमित कुलकर्णी अमरसिंह पाटणकर, याज्ञसेन पाटणकर, हिंदूराव पाटील, राजाभाऊ शेलार आदी उपस्थित होते. होती.

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, माणसाने स्पर्धा करावी ती स्पर्धा ज्ञानाशी असावी. स्टार्टअप इंडियामध्ये जगभरात आपण पोहचलो आहोत. भारताकडे बुद्धीमत्ता आहे फक्त आधाराची गरज असते. जगाभरातील अनेक कार्पोरेट कंपन्यांचे सीईओ भारतीय आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

 आमदार डॉ. भोसले म्हणाले, आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यात वस्तीगृहांना मोठ्या प्रमाणात मदत दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

     प्रास्ताविक संजीव चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दीपक डांगे यांनी तर आभार एस डी पवार यांनी मानले.

0000

संबंधित पोस्ट

मल्हार पेठ येथे डिजिटल नेमप्लेट आणि क्यूआर कोड प्रणालीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते शुभारंभ* 

धारणीतील महाविधी शिबिरात शेवटचा घटक आश्वस्त*विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम*36 स्टॉलवर शासकीय विभागांची माहिती….

vishwatmaklokswamivarta

बालमहोत्सवातून मुला – मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे-तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिमाखात सुरू

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी “एक गाव एक गणपती”संकल्पनेनुसार शांतता व सौहार्दपूर्ण  वातावरणात उत्सव साजरा करावा” _पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड

पालघर जिल्ह्यामध्ये कृषी महाविद्यालय व मत्स्य विद्यालय स्थापन-करण्याबाबत शासन सकारात्मक- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे