vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

 देशभरात चक्रीवादळाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

राज्य प्रतिनिधी-भारतीय हवामान विभागाने 21 ऑक्टोबरला देशभरात चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे अकरा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि समुद्रात उंच लाटा उभ्या राहण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा फटका मुख्यतः केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांना बसणार आहे. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान अंदमान-निकोबार बेटसमूहात मुसळधार ते अति-मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. निकोबार बेटांमध्ये सात ते अकरा सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्रात चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील, काही ठिकाणी हा वेग पन्नास किमी प्रति तासांहून अधिक होऊ शकतो. 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान अंदमान समुद्रात पस्तीस ते पंचेचाळीस किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि समुद्रात उंच लाटा निर्माण होतील.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta

समुद्र ही केवळ सीमा नव्हे तर ती विकासाची संधी आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी क्षेत्रावर भारतीय सामर्थ्याचा झेंडा रोवला होता. याच सामर्थ्याला पुढे नेऊन भारत आज जगासाठी सागरी उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील दीपस्तंभाची भूमिका निभावण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ मध्ये केले.

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ मतदार यादी प्रसिद्ध**अद्याप नोंदणी नसलेल्या पात्र मतदारांनी नोंदणी करावी**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

वरदविनायक महिला स्वयंसहायता समूह बचतगट,भायमाला,कामार्लेयांची ध्येयाकडे वाटचाल

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

vishwatmaklokswamivarta