राज्य प्रतिनिधी-भारतीय हवामान विभागाने 21 ऑक्टोबरला देशभरात चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे अकरा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि समुद्रात उंच लाटा उभ्या राहण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा फटका मुख्यतः केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यांना बसणार आहे. 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान अंदमान-निकोबार बेटसमूहात मुसळधार ते अति-मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. निकोबार बेटांमध्ये सात ते अकरा सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. समुद्रात चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील, काही ठिकाणी हा वेग पन्नास किमी प्रति तासांहून अधिक होऊ शकतो. 22 ते 23 ऑक्टोबर दरम्यान अंदमान समुद्रात पस्तीस ते पंचेचाळीस किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि समुद्रात उंच लाटा निर्माण होतील.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमिवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.