vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर;२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन

कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर;२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन

मुंबई,  प्रतिनिधी : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा यांच्यातर्फे कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२५-२०२६ जाहीर करण्यात आली आहे. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निबंध कागदाच्या एकाच बाजूस टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहावे. निबंधाच्या चार प्रती तयार करून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे सादर करावे, असे भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे मानद सचिव विजय सतविर सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

या वर्षीच्या स्पर्धेसाठी १) कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग (Era of Artificial Intelligence), २) सोशल मीडिया : आव्हाने आणि संधी (Social Media: Challenges and Opportunities), ३) नागरिकांचे जीवन सुलभ करणे (Ease of Living) हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धेतील निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत सादर करता येतील. निबंध तीन हजार शब्दांपेक्षा कमी आणि पाच हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा. निबंध विषयानुसार विश्लेषणात्मक, संशोधनपर आणि पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा ओळख नमूद करू नये. स्पर्धकाचे नाव, टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्ता स्वतंत्र लिफाफ्यात नमूद करून पाठवावा.स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, अधिक माहिती आणि नियमावलीसाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.iipamrb.org.in भेट देता येईल. असेही मानद अध्यक्ष, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा,मंत्रालय मुंबई यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

देशव्यापी सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाचा25 सप्टेंबरपासून शुभारंभ  नागरिकांसाठी महिनाभर देशव्यापी सायबर सुरक्षा व गोपनीयता जनजागृती अभियान· नागरिकांना सायबर सुरक्षा व गोपनीयतेच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल मार्गदर्शन होणार

vishwatmaklokswamivarta

शासकीय कामकाजाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आवश्यक‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ मध्ये तज्ज्ञांचे मत…

28 हजार भरा आणि गाडी घरी घेऊन जा, या कंपनीची जबरदस्त ऑफर

Super Admin

भारताचे डिजिटल पेमेंट इंटरफेस युपीआयचा नवा विक्रम; डिसेंबरमध्ये झाले 12.82 ट्रिलियन किमतीचे 7.82 अब्ज व्यवहार..

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – ‘एआय’चा वाढता प्रभाव- कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी

vishwatmaklokswamivarta

Viचा धमाका; या दोन कंपन्यांना टक्कर, लॉन्च केले दोन स्वस्त रिचार्ज प्लान

Super Admin