vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत (दि.13 डिसेंबर 2025) रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. या लोक अदालतीच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

  या लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची एकूण 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 316 प्रकरणांमधून रुपये 6 कोटी 80 लाख 14 हजार 963 इतकी घरपट्टी वसुल करण्यात आली. तसेच पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 474 प्रकरणांमधून रुपये 1 कोटी 14 लाख 41 हजार 550 इतकी पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.

   अशा प्रकारे घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

   मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची आर्थिक स्वयंपूर्णता, महसूलवाढ व प्रशासकीय कार्यक्षमता वाढीस मदत होत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विकासाला गती मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तसेच उर्वरित रहिवाश्यांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरणाकरणेत यावी असे आवाहन ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000000

संबंधित पोस्ट

त्रिभाषा धोरण निश्चिती समिती बुधवारी (दि.२६) विभागात…

vishwatmaklokswamivarta

भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत प्रेक्षकांना देशातील व देशाबाहेरील दर्जेदार नाटकांचा अनुभव घेता येणार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

बनावट वेबसाइट्स,अप आणि खोट्या ई-चालान लिंकपासून सावध राहा-परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजीचा भ्याड दहशतवादी हल्ला जीवाची बाजी लावत परतवून लावताना मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीरमरण आलेल्या शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

vishwatmaklokswamivarta

शिवदिक्षा व गुरू मंत्र संस्कार व सत्संग सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे विश्र्वरूप हॉल येथे संपन्न…

vishwatmaklokswamivarta

मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार* *मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..!*   *- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस