vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत (दि.13 डिसेंबर 2025) रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. या लोक अदालतीच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

  या लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची एकूण 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 316 प्रकरणांमधून रुपये 6 कोटी 80 लाख 14 हजार 963 इतकी घरपट्टी वसुल करण्यात आली. तसेच पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 474 प्रकरणांमधून रुपये 1 कोटी 14 लाख 41 हजार 550 इतकी पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.

   अशा प्रकारे घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

   मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची आर्थिक स्वयंपूर्णता, महसूलवाढ व प्रशासकीय कार्यक्षमता वाढीस मदत होत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विकासाला गती मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तसेच उर्वरित रहिवाश्यांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरणाकरणेत यावी असे आवाहन ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राच्या कृषी-अन्नप्रक्रिया क्षेत्राला जागतिक संधी – पणन मंत्री जयकुमार रावल वर्ल्ड फूड इंडिया २०२५ प्रदर्शनात महाराष्ट्र दालनाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ते 24 मे दरम्यान अरबी समुद्र खवळण्याची शक्यता राज्यातील मासेमाऱ्यांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवावे…

१० मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत- मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

सुपर एल निनो’: २०२६ चा उन्हाळा आणि उष्माघाताचे संकट – वेळीच व्हा सावध!

13 ते 15 ऑगस्ट कालावधीत हर घर तिरंगा अभियान* जिल्हाधिकारी संतोष पाटील*