vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 7 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम वसूल…

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत (दि.13 डिसेंबर 2025) रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा परिषद रायगड अंतर्गत ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. या लोक अदालतीच्या माध्यमातून घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

  या लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून घरपट्टीची एकूण 27 हजार 341 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 316 प्रकरणांमधून रुपये 6 कोटी 80 लाख 14 हजार 963 इतकी घरपट्टी वसुल करण्यात आली. तसेच पाणीपट्टीची 6 हजार 689 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 474 प्रकरणांमधून रुपये 1 कोटी 14 लाख 41 हजार 550 इतकी पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे.

   अशा प्रकारे घरपट्टी व पाणीपट्टी मिळून एकूण 34 हजार 030 प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 790 प्रकरणांमधून एकूण रुपये 7 कोटी 94 लाख 56 हजार 513 इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

   मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची आर्थिक स्वयंपूर्णता, महसूलवाढ व प्रशासकीय कार्यक्षमता वाढीस मदत होत असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण विकासाला गती मिळत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तसेच उर्वरित रहिवाश्यांनी पाणीपट्टी, घरपट्टी भरणाकरणेत यावी असे आवाहन ग्रामपंचायत विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000000

संबंधित पोस्ट

महाकुंभपर्वात हिंदु जनजागृती समितीचे प्रदर्शन युवकांना भावले; कार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

vishwatmaklokswamivarta

मान्सूनमध्ये वीज पडण्यापासून बचाव करण्यासाठी ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जालन्यात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात मोर्चा; सरकारला जनतेच्या रोषाचा इशारा..

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा! . प्रशासनाने नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तदि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश.. 

उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन जास्तीत जास्त खेळाडूंनी शिबिरात सहभाग घ्यावा