vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सन २०२५ च्या कॅलेंडर वर्षासाठी राज्यस्तरीय व विभागीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ स्पर्धा जाहीर करण्यात आली असून या विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून १५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

    *पुरस्काराच्या प्रमुख श्रेणी:*यावर्षी देखील विविध क्षेत्रांतील योगदानासाठी खालीलप्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेत:

* उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

 * उत्कृष्ट लेखन पुरस्कार

 * उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार

 * उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार

* सोशल मीडिया (समाज माध्यम) पुरस्कार

 * स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

*अर्जासाठी महत्त्वाच्या बाबी:* * कालावधी: हे पुरस्कार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनासाठी दिले जातील. * अंतिम तारीख: प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे.

 * अर्ज कुठे करावा? माहिती व अर्ज नमुने शासनाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:• www.maharashtra.gov.in• dgipr.maharashtra.gov.in• https://mahasamvad.in (ब्लॉग)   या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक पत्रकारांनी आपल्या संबंधित विभागीय माहिती कार्यालय/जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (माहिती) श्री.गोविंद अहंकारी यांनी केले आहे.*(माहितीपत्रक सोबत जोडले आहे.)*

0000000

संबंधित पोस्ट

डॉ मनसुख मांडविया यांनी ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे खासदारांसोबत सायकल चालवली, नागरिकांना भारतात उत्पादित वस्तू विकत घेण्यासाठी केले प्रेरित आत्मनिर्भर व निरोगी भारताप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देत राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘गर्व से स्वदेशी’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला

vishwatmaklokswamivarta

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा – रस्ता सुरक्षा समितीची राज्य शासनाला सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक; हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

आसाम, केरळम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.

vishwatmaklokswamivarta

५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती करणारा बीड जिल्हा राज्यात प्रथम!महाराष्ट्राला घरकुलांचे अधिकचे उद्दीष्ट मंजूर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार…

vishwatmaklokswamivarta