vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सन २०२५ च्या कॅलेंडर वर्षासाठी राज्यस्तरीय व विभागीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ स्पर्धा जाहीर करण्यात आली असून या विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून १५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

    *पुरस्काराच्या प्रमुख श्रेणी:*यावर्षी देखील विविध क्षेत्रांतील योगदानासाठी खालीलप्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेत:

* उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

 * उत्कृष्ट लेखन पुरस्कार

 * उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार

 * उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार

* सोशल मीडिया (समाज माध्यम) पुरस्कार

 * स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

*अर्जासाठी महत्त्वाच्या बाबी:* * कालावधी: हे पुरस्कार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनासाठी दिले जातील. * अंतिम तारीख: प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे.

 * अर्ज कुठे करावा? माहिती व अर्ज नमुने शासनाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:• www.maharashtra.gov.in• dgipr.maharashtra.gov.in• https://mahasamvad.in (ब्लॉग)   या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक पत्रकारांनी आपल्या संबंधित विभागीय माहिती कार्यालय/जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (माहिती) श्री.गोविंद अहंकारी यांनी केले आहे.*(माहितीपत्रक सोबत जोडले आहे.)*

0000000

संबंधित पोस्ट

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारासाठी राज्य शासनाने 500 कोटींचा निधी द्यावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी,बैठकीत सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यास मान्यता

विपश्यना केंद्र, सांस्कृतिक भवनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.8 ते 21 एप्रिल 2026 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले

दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा रायगडावर शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

vishwatmaklokswamivarta

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.