vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर१५ मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सन २०२५ च्या कॅलेंडर वर्षासाठी राज्यस्तरीय व विभागीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ स्पर्धा जाहीर करण्यात आली असून या विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून १५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

    *पुरस्काराच्या प्रमुख श्रेणी:*यावर्षी देखील विविध क्षेत्रांतील योगदानासाठी खालीलप्रमाणे पुरस्कार दिले जाणार आहेत:

* उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

 * उत्कृष्ट लेखन पुरस्कार

 * उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार

 * उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार

* सोशल मीडिया (समाज माध्यम) पुरस्कार

 * स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

*अर्जासाठी महत्त्वाच्या बाबी:* * कालावधी: हे पुरस्कार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांकनासाठी दिले जातील. * अंतिम तारीख: प्रवेशिका सादर करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे.

 * अर्ज कुठे करावा? माहिती व अर्ज नमुने शासनाच्या खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:• www.maharashtra.gov.in• dgipr.maharashtra.gov.in• https://mahasamvad.in (ब्लॉग)   या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक पत्रकारांनी आपल्या संबंधित विभागीय माहिती कार्यालय/जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक (माहिती) श्री.गोविंद अहंकारी यांनी केले आहे.*(माहितीपत्रक सोबत जोडले आहे.)*

0000000

संबंधित पोस्ट

सागरी सुरक्षेसोबतच मत्स्योत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

वाराणसीमध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी तरुणांना तंदुरुस्त आणि ड्रग्जमुक्त भारतासाठी सायकलिंग करण्यासाठी दिले प्रोत्साहन

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप