vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत राज्यातील १११ केंद्रांवर १५ हजारांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत

राज्यातील १११ केंद्रांवर १५ हजारांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) अंतर्गत सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदासाठीची लेखी परीक्षा आज रविवारी राज्यातील १११ परीक्षा केंद्रांवर शांततेत व सुरळीत पार पडली. एकूण १३४ रिक्त पदांसाठी आयोजित या परीक्षेस २३ हजार ३३६ अर्जदारांपैकी तब्बल १५ हजार ५४१ उमेदवारांनी हजेरी लावली.

ही परीक्षा सकाळी ९ ते ११ या वेळेत घेण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, अमरावती, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, चंद्रपूर आदींसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील केंद्रांवर परीक्षा निर्विघ्नपणे पार पडली. सर्व केंद्रांवर आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्रवेशपत्र व ओळखपत्रांची काटेकोर तपासणी, सीसीटीव्हीद्वारे देखरेख, व्हिडिओग्राफी तसेच कडक सुरक्षा व्यवस्था यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त अबाधित राखण्यासाठी केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनी विशेष दक्षता घेतली.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्रीमती सुचिता भिकाने यांनी परीक्षेचे काटेकोर नियोजन केले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रनिहाय आढावा घेत परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली.

परीक्षेदरम्यान केंद्राच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत जमावबंदी लागू करण्यात आली होती. परीक्षा केंद्रात विनापरवानगी प्रवेश, तसेच उमेदवारांना कोणतेही लिखित साहित्य किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण बाळगण्यास सक्त मनाई होती. पोलिस बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मोठ्या संख्येने उमेदवार उपस्थित असूनही महापारेषणच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण राज्यात परीक्षा शांततेत, पारदर्शक आणि यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती महापारेषणतर्फे देण्यात आली.

 

000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे नामकरणशाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर केंद्राचे बळकटीकरण करा -उपमुख्यमंत्री

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर  काय म्हणाला, मीही मेलो असतो तर..; भारतीय हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहरची प्रतिक्रिया..

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

*विशेष वृत्त* *बालसंगोपन योजनेअंतर्गत ९७ लाखांच्या अनुदानाचे वाटप;

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार नावाने दिला जाणार,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा..

vishwatmaklokswamivarta

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण निकाल ८९ पूर्णांक ७९ शतांश टक्के. ..